शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २००९

याला जीवन ऐसे नाव ...

काही दिवसांपूर्वी मी सरश्री तेजपारखी यांचे एक खुप सुन्दर पुस्तक वाचले ..स्विकाराची जादू .. त्याचे थोडक्यात विवेचन मी इथे देत आहे आयुष्यात कुटुंब, कामाचं ठिकाण, नातेवाईक, समाज अशा अनेक ठिकाणी संकटं येतात। संकटं टाळता येणं शक्य नाही, पण... दु:ख टाळता येणं शक्य आहे। एखाद्या घटनेकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलता येते आणि तीच ताकद विचारांमध्ये असते।कारण कोणत्याही कृतीच्या मुळाशी एक माणूस म्हणून यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकाने हे वाचायला हवं... नव्हे, अगदी १००% आचरणात आणायला हवं ! ...वाचून आपल्या प्रतिक्रिया जरुर दया ....
कुठलीही घटना सुख वा दुःख तयार करत नाही तर त्या घटनेमुले आपल्या मनामधे जे विचार सुरु होतात त्या विचारामुले आपण सुखी व दुखी होत असतो। समजा आपल्या पाकिट हरवले तर ते हरवलेले पाकिट नव्हे तर पाकिट हरावल्याच्या विचारने दुःख होते. म्हणजेच ती घटना नाही तर त्या बाबत मनात आलेले विचार दुखास कार्नीभुत असतात. म्हणजेच जर तुम्ही दुखी होऊ इछित नसाल तर जगातील कुठलीही घटना तुम्हाला दुखी करू शकणार नाही.बर्याचदा जीवनात अनेक वाईट प्रसंग येतात तेव्हा हे ही बदलून जाईल असे म्हणुन पुढे जावे. एखाद्या प्रिय व्यक्तीचे निधन होते तर तेव्हा शेवटी कुठेतरी थाम्बावे लागतेच. असे म्हणुन पुढे वाटचाल करावी आणि कुठल्या गोष्टीला किती कीमत द्यावी तर समजा एखाद्या दुकानात एक रुपयाची काडीपेटी पाच रुपयाला मिळत असेल तर ती कीमत देऊन आपण घेऊ का? नाही ना ॥ कारण त्याची जितकी किम्मत आहे तितकीच तुम्ही देऊ इच्छिता त्याचप्रमाणे आपल्या जीवनात काही अप्रिय घटना घडून गेल्या आहेत किवा घडत आहेत. त्याना किती कीमत दिली पाहिजे आणि आपण किती कीमत देत आहोत हे पडतालूंन पाहिले पाहिजे आपण स्वताला व्यावहारिक समजतो आणि मग अविचाराने व्यवहार करतो. एखाद्या घटनेचे दुःख किती काल करायचे ? हे स्वताच समजुन घेतले पाहिजे.आणि आपल्या दुखाला आपणच जबाबदार असतो. जेव्हा आपण आपल्या दुखाचीजबाबदारी स्वीकारतो तेव्हा आपण इतरांविषयी तक्रार करणे बंद करतो.जेव्हा आपण स्वताला दुखी होऊ देऊ शकतो तेव्हा आपण स्वताला आनंदी ही होऊ देऊ शकतो.समजा आपल्याला कुणी वाईट शब्द वापरले तर आपणास दुःख होते आणि एखाद्याने आपले कौतुक केले तर मात्र आपणास खुप आनंद होतो म्हणजेच याचा अर्थ आपला रिमोट समोरील व्यक्तीच्या हातात आहे तो जसे बटन दाबेल त्याप्रमाणे आपणास सुख वा दुखाची प्राप्ति होत असते. तेव्हा आपले रिमोट समोरील व्यक्तीच्या हातात देने हीच आपली चुक आहे. आपले रिमोट आपल्याच हाती असू दया आणि बाहेरच्या घटनानी विचलित न होता सदैव आनंदी रहायला शिका .थोड्या प्रयत्नानी हे सहज शक्य होते. लहान मूल जेव्हा चालायला शिकते त्यावेळी ते चालते कमी आणि पड़ते जास्त आणि मग तरीही ते चालायला शिकते की पडायला.... तर चालायलाचना.. का तर ते अपयशाने खचून जात नाही किवा विचलित होत नाही म्हणुन ...
माणुस नेहमी भुत किवा भविष्यात जगत असतो। समजा उदया रविवार आहे तर आज आपल्याला खुप बरे वाटते अर्थात इन्सान कल का इस्तेमाल करे कल उसका इस्तेमाल न करे ... इन्सान यदि वर्तमान में नहीं रह पाता तो इसका मतलब है की कल उसका इस्तेमाल कर रहा है ॥मानसाजवल असणारे सुखच त्याच्या दुःखाचे कारन असते। त्याच्या जवळ पद, प्रतिष्ठा, पैसा, परिवार, मित्रांचे प्रेम या सर्व गोष्टी असतील तर तो सुखी असतो या सर्व गोष्टी नसतील तर तो काय सुखी राहू शकेल॥ यातील एक जरी गोष्ट नष्ट जाली तरी तो दुखी होतो म्हणजेच ...अप्रत्यक्षपने हे सुखच त्याच्या दुःखाचे कारन आहे।कुठलीही घटना चांगली किवा वाईट नसते. हर एक अपनी जगह पर सही होता है॥ आपण त्याकडे ज्या दृष्टिकोनातून बघतो तो दृष्टिकोण त्या घटनेला चांगले किवा वाईट स्वरुप प्राप्त करून देत असते. तेव्हा ती घटना किवा दुःख स्वीकार करायला शिका. स्वीकार करना मतलब मुश्किलोसे भागना नहीं बल्कि उसे सुलजाने का पहला कदम है.. समजा तुम्हाला ऑफिसला जायला उशीर जालेला आहे आणि बाहेर येउन बघतो तर तुमच्या कारला चिटकुन कुणी तरी आपली कार लावली आहे या गोष्टीला जर तुम्ही स्वीकार केले तर तुम्ही शांतपणे विचार कराल की त्याची देखिल काहीतरी मज़बूरी असेल तेव्हा तुम्ही शांतपणे त्याला कार काढायला सांगू शकालआणि तो ही आपली गाड़ी बाजूला घेउन तुम्हाला मार्ग करून देईल. नाही तर तुम्ही रागात त्याच्याशी भांडत बसला असता. स्वीकार करने की भावना की साथ इन्सान के दोनों हाथ खुल जाते है और वो खुले हाथोसे समस्यावोको सुलज़ा पाता है...तुम्हे कोई दर्द महेसुस हुआ और तुमने उसे स्वीकार किया तो तुम देखोगे अब दर्द वैसा नहींलगता जैसे पहेले लगता था... स्वीकार के साथ ही दर्द और दर्दका दुःख कम हो जाता है..अर्थात दर्द हो मगर दर्द का दुःख ना हो , सुख हो मगर सुख जाने का दुःख ना हो ....
- राज शिंदे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा