शनिवार, ५ मार्च, २०११

सुखाचा शोध ...


‘मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं?’
प्रशांत दामलेच्या एका लोकप्रिय नाटकातलं त्यानंच गायलेलं हे गीत म्हणजे मला तमाम माणसांच्या मनाच्या भावना अधोरेखित करणारं गीत वाटतं. प्रत्येक माणूस जे जीवन जगतो ते सुख मिळविण्यासाठी व त्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी. तसंच आपल्याला हा जो मानवी जन्म लाभला आहे त्याचे प्रयोजन काय? जीवनाचा अर्थ काय आहे? असा प्रश्न केव्हा ना केव्हा प्रत्येक माणसाला पडतोच.
आपलं जीवन अर्थपूर्ण असावं, जीवनात काही तरी चांगले- वेगळं करावं, ही प्रेरणा उपजतच असते. पण तरीही बहुसंख्य माणसांना खऱ्या आनंदाचा- सुखाचा शोध लागत नाही आणि आपल्या जीवनाचे प्रयोजन समजत नाही, हीपण एक वस्तुस्थिती आहे. आज भौतिक संपन्नतेच्या जगात लौकीकार्थानं सुखोपभोगाला तोटा नाही. तरीही मग आपण अस्वस्थ का आहोत? तथाकथित भौतिक सुखही का टोचू लागतं? भोगाचा का कंटाळा येऊ लागतो? आणि मुख्य म्हणजे विंदांनी म्हटल्याप्रमाणे ‘तेच ते- तेच ते’ दिनक्रम करताना जीवनाची क्रियाच मुळी का निर्थक वाटू लागते? ज्याला विचार करायची सवय आहे व जो अंतर्मनात जागृत चिकित्सक आहे, त्याला जीवन अर्थशून्य वाटू लागतं आणि उदासीनता येऊ लागते.
शाश्वत सुखाचा शोध आणि जीवनाचा अर्थ लावणे या दोन्ही बाबींवर अनेक तत्त्वज्ञ, विचारवंत व धर्मगुरू यांनी बरंच काही लिहून ठेवले आहे. धर्म- अध्यात्म- तत्त्वज्ञान या अंगानं भक्ती व अध्यात्मामुळे चिरंतन सुख लाभतं आणि जीवन सुकर होतं, असं म्हटलं आहे. मला व्यक्तिश: पन्नाशीनंतरही हा आध्यात्मिक मार्ग चोखाळून सुखाचा शोध लागेल व जीवन सुकर होईल, असं वाटत नाही. कदाचित माझ्या इह व ऐहिकवादी वृत्तीची ती मर्यादा वा अज्ञान असेल. एक व्यापक कर्मकांडरहीत मूलभूत अध्यात्मिकता मला मान्य आहे. पण धर्म व ईश्वरोपासना हाच त्याचा एकमेव मार्ग आहे, हे बुद्धीला व तर्काला पटत नाही.
मग मला सतावणारा खरं सुख म्हणजे काय व जीवनाचं प्रयोजन काय आहे, या दोन जिज्ञासा व प्रेरणांचे का? मला त्याचा कसा शोध लागेल व कसा बोध होईल?
मी एक लेखक व वाचक आहे, त्यामुळे सुखाच्या तसेच दु:खाच्या क्षणीही पुस्तकांना जवळ करतो आणि माझा आनंद- सुख शतगुणित होतो आणि दु:खाचा निचरा होतो. मन कसं शांत- निर्विकार होतं. मला माहीत नाही, पण अशाच क्षणी मला अध्यात्माचा स्पर्श झाल्याचं जाणवतं.
शाश्वत सुख आणि जीवनाचं खरं प्रयोजन यासंदर्भात मलाही अनेकवार प्रश्न पडले आहेत आणि मन उदास होऊन गेलंय. त्याचा मी माझ्या बुद्धी-भावनेनं विचार करीत शोध घ्यायचा प्रयत्नही केलाय. पण लिओ टॉलस्टॉयच्या साहित्यातून मला त्या संदर्भात जे मिळालं, त्यानं माझा शोध थांबला आहे. माझ्या बुद्धी, भावना, प्रेरणा आणि वृत्तीला पटणारा व भावणारा अर्थ टॉलस्टॉयच्या ‘हाऊ टू रिड गॉस्पेल?’, ‘दि पाथ ऑफ लाईफ’ आणि ‘व्हॉट देन मस्ट वुई डू?’ या तीन निबंधांनी गवसला.
मी टॉलस्टॉयचा जबरदस्त फॅन आहे. त्याच्या तीन कादंबऱ्या ‘अ‍ॅना कॅरेनिना’, ‘वॉर अ‍ॅण्ड पीस’ आणि ‘रिझरेक्शन’ जगातील सर्वश्रेष्ठ कादंबऱ्या आहेत. टॉलस्टॉय, दोस्तोव्हस्की, शेक्सपिअर व आपले प्रेमचंद व शरदचंद्र चॅटर्जी हे पाच लेखक हे सर्वकालीन श्रेष्ठ मानवी जीवनाचे ललित भाष्यकार आहेत. जीवनाचे सर्व पैलू आणि मानवी मन, तिच्या भाव-भावना आणि विविध विकार समग्रतेनं जाणायचे असतील तर महाभारत व हे पाच लेखक वाचावेत. त्यानंतर दुसरं काही आयुष्यभर वाचलं नाही तरी चालेल. हे साहित्य वाचलेला वाचक हा कायम सुजाण व उदार राहील- असेल!
पण टॉलस्टॉयला जीवनाच्या उत्तरार्धात (व आधीही मधून मधून) शाश्वत सुख, जीवनाचे खरे प्रयोजन व धर्म- आध्यात्मिकतेबाबत प्रश्न पडत होते. त्याच्या स्वभावाप्रमाणे याही प्रश्नाला तो थेटपणे भिडला. तसा तो धार्मिक ख्रिस्ती होताच, पण कर्मकांडापासून शेकडो कोस दूर. त्यानं पुन्हा बायबलचा अभ्यास केला, सॉक्रेटिस, सॉलोमन, शोपेनहॉर, बुद्ध आदींचे ग्रंथ- विचार अभ्यासिले आणि मग त्याला गवसलेल्या अन्वयार्थाची परिणती म्हणजे वर नमूद केलेले निबंध होत!
ज्यांनी मी सार्वजनिक जीवनातली मूर्तिमंत शुचिता, साधुत्व आणि नैतिकतेचा प्रखर आवाज मानतो, त्या ग. प्र. प्रधानांनी टॉलस्टॉयला जी जाहीर पत्रे लिहिली व त्याद्वारे टॉलस्टॉयच्या जीवन, साहित्य व विचारांचा मागोवा घेतला, त्याचं ‘टॉलस्टॉय यांच्याशी पत्रसंवाद’ या नावानं पुस्तकही झालं, ते वाचताना टॉलस्टॉयच्या या तीन निबंधांचा आणि त्यानं सुख व जीवनाचा जो अर्थ लावला, त्याचं विवेचन प्रधान सरांनी स्वत:चे अंतरंग त्यात मिसळून जे केलं आहे, ते फार मूलगामी, मौलिक आहे. ते मी पुन: पुन्हा वाचलं आणि आता जर मला प्रशांत दामलेंनी ‘मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं?’ असा प्रश्न केला तर मी त्यांना त्याचं यथोचित उत्तर देऊ शकेन.
टॉलस्टॉयनं लोक का व कशा पद्धतीनं जगतात हे सांगताना म्हटलंय, लोक चार पद्धतीनं जगतात. काहीजण अज्ञानी असतात, काहीजण सुखोपभोगात जगत असतात, काहीजण शारीरिक व बौद्धिक सामथ्र्य मिळवीत जगतात, तर काहीजण दुबळेपणानं जगत राहतात. पण त्यांना शाश्वत सुख व जीवनाचा खरा अर्थ त्याद्वारे गवसत नाही. टॉलस्टॉयनं ‘हाऊ टू रिड गॉस्पेल’मध्ये यासंदर्भात पुढे असं म्हटलंय की, प्रत्येकालाच बुद्धी व सदसद्विवेकबुद्धी असते व त्या आधारे सत् काय असत् काय, चांगले काय व वाईट काय, हे तो ठरवीत असतो. माणसाला जीवनात केवळ वासनांची व शारीरिक प्रेरणांचीच- अ‍ॅनिमल इन्स्टिक्टचीच तृप्ती करायची नसते, तर या विश्वाचा आधार असलेल्या उदात्त शक्तीशी आपले नाते आहे, हे जाणून त्या उदात्त शक्तींच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे, तरच तो सुखी होईल.
या उदात्त शक्तींच्या आज्ञा कोणत्या? माणसांनी सुख-समाधानाने राहावे व जगात शांतता नांदावी यासाठी येशू ख्रिस्तांनी ज्या पाच आज्ञा दिल्या आहेत, त्याचे मोठे मार्मिक विवेचन टॉलस्टॉयने केले आहे. त्या आज्ञा अशा आहेत. एक- सर्वासोबत शांततेने राहा व कोणावरही रागावू नका. दोन- लैंगिक सुखाची इच्छा नैसर्गिक आहे, पण तिचे स्वैराचारात रूपांतर करू नका. पती-पत्नीचे पवित्र नाते जपा. तीन- कधीही शपथ घेऊ नका. जे सत्य आहे ते ‘हो’ किंवा ‘नाही’ या शब्दात सांगा. कोणाचा न्यायनिवाडा करीत त्याला दोषी ठरवू नका. चार- जो अन्याय करतो, त्याचा प्रतिकार बळाने करू नका, हिंसेचा प्रतिकार हिंसेने करू नका. पाच- देश-परदेश असा भेदभाव न करता सर्वाशी सख्यत्वाने वागा. टॉलस्टॉय पुढे असं म्हणतात, ख्रिस्ताने कुठेही ‘फॉलो मी’ असं म्हटलेलं नाही, तर ‘फॉलो द ट्रथ’ (सत्याचे पालन करा) असाच संदेश दिला आहे.
जीवनाचा अन्वयार्थ व जीवनाची सार्थकता या पाच ख्रिस्त आज्ञेत टॉलस्टॉयनं शोधली. तसा विचार केला तर थोडय़ाफार फरकानं सर्वच धर्मानं हेच तर सांगितलेलं आहे. याच्या आधारे जीवन सार्थक होऊ शकतं, असा टॉलस्टॉयचा विश्वास आहे. मला तो वाचताना व त्यावर विचार करताना मनापासून पटतो. कारण टॉलस्टॉय हा केवळ तत्त्वज्ञ विचारवंत नव्हता, तर कलावंत होता आणि खरा कलावंतच जीवनाचा खरा व समर्थ भाष्यकार असतो. मी धर्मगुरूपेक्षा कादंबरीकार श्रेष्ठ मानतो व त्याच्या विचारांना अनुसरतो. भगवद्गीतेपेक्षा ज्ञानदेवांचं ‘पसायदान’ मी मोठं मानतो तो याच श्रद्धेतून!
आता शाश्वत सुखाच्या शोधाबद्दल टॉलस्टॉय का म्हणतो ते पाहूया. ‘व्हॉट आय बिलिव्ह’ पुस्तकातील ‘दि पाथ ऑफ लाईफ’मध्ये त्यांनी एक मूलगामी विचार मांडला आहे. जर माणूस स्वत:साठी जगला तर त्याचं जीवन विफल होईल, पण जर कक्षा रूंद करून तो समाज व अखिल मानवजातीसाठी यांच्या सुखासाठी जगू लागला तर त्याचे जीवन सफल होईल.
माणसाला जर खरं सुख मिळायचं असेल तर काय केलं पाहिजे, याचे टॉलस्टॉयनं अनुभव व विचारमंथनातून गवसलेलं नवनीत सादर करीत लिहिलंय. सुखासाठी पहिली आवश्यक गोष्ट म्हणजे माणसाचे निसर्गाशी जिव्हाळ्याचे नाते हवे व त्यात कोणताही बिघाड आणता कामा नये. मानवानं मोकळ्या सूर्यप्रकाशात, धरतीमातेच्या कुशीत व वृक्षवल्ली-पशुपक्षी या सोयऱ्यांसोबत राहिलं पाहिजे. सुखासाठी दुसरी आवश्यक गोष्ट म्हणजे प्रत्येकानं आपल्या आवडीचं काम केलं पाहिजे व काही प्रमाणात अंगमेहनत केली पाहिजे. तरच शांत सुखाची झोप लागते. तिसरी गोष्ट म्हणजे, जिव्हाळ्याचे समाधानी कौटुंबिक जीवन. चौथी गोष्ट म्हणजे ‘जीवाचे मैत्र’. वेगवेगळ्या लोकांशी स्नेह-मैत्रीचे संबंध ठेवणे. पाचवी गोष्ट फार महत्त्वाची आहे- शरीर सुदृढ असतानाचा येणारा नैसर्गिक मृत्यू. अर्थात हे आपल्या हाती नसतं. या सर्वाचा परिणाम हा आहे की, व्यक्ती व समाजाचे सुख एकमेकांत गुंतले आहे व निसर्गाशी समरस होऊन त्याचा विध्वंस न करता एकरूप होण्यात आहे.
वाचकहो, तुम्हाला वाटेल, टॉलस्टॉयनं यात नवीन काय सांगितलं? नवीन नक्कीच नाही, पण ते अनुभवसिद्ध व पारखून- विचार करून घेतलेले जीवन तत्त्वज्ञान आहे. हे विचारकण अनुभवाचे आहेत, आचारायचे आहेत. ‘दि आर्ट लिव्हिंग’ही करून पाहण्यात व अनुभवात सामावलेली आहे. टॉलस्टॉय या कलावंत तत्त्वज्ञाचं हेच वैशिष्टय़ होतं. तो पुरेपूर जीवन जगला. त्याग आणि भोग, मोह आणि वैराग्य, पाप आणि पुण्याचा जगण्यातून त्यानं अनुभव घेतला व हंसक्षीर विवेकानं आपल्या लेखनातून शाश्वत सुख कशात असतं, हे सांगितलं.
मी असं मानतो की, धर्मज्ञ जे धार्मिक वचनातून सांगतात तेच श्रेष्ठ कलावंत साहित्यिक साहित्यातून सांगतात. ते अधिक जिवंत असतं. मन व बुद्धीला ते तीव्रतेनं पटतं. म्हणून टॉलस्टॉयला मी मानतो.
उद्या मला केव्हा जीवनाच्या प्रयोजनाबद्दल प्रश्न पडला व कशात सुख मानायचं, असं कोडं पडलं तर मी टॉलस्टॉयचे शब्द प्रमाण मानीन। त्याचं पुन्हा वाचन करीन आणि म्हणेन, येस. मला नक्की सांगता येईल, सुख म्हणजे काय असतं!
- लक्ष्मीकांत देशमुख

मंगळवार, १ मार्च, २०११

विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास जागृत करण्याची गरज !


कोणताही निर्णय घेण्याआधी जवळच्यांना अथवा वरिष्ठांना त्याविषयी विचारणे, हा मनुष्यप्राण्याच्या प्राकृतिक स्वभाव असणे

`प्रत्येक दिवसागणिक होणाऱ्या लहान मुलांच्या आत्महत्या आज राज्यस्तरावर चिंतेचा विषय बनला आहे. प्रतिदिन या संख्येत भरच पडते आहे. यापूर्वीही लहान मुलांच्या आत्महत्यांचे प्रसंग घडले नाहीत, असे नाही; परंतु अशा प्रकारे आत्महत्यांची मालिका सिद्ध होण्याची वेळ ही पहिलीच. कोवळया वयात मुलांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेणे, हे जसे आश्चर्यकारक आहे, तसे त्यांना हा निर्णय घेण्यास भाग पाडणाऱ्या किंवा तशी परिस्थिती निर्माण करणाऱ्या घटकांचा विचार करणेही तितकेच आवश्यक आहे. जीवन म्हणजे काय, ते जगायचे कसे, फुलवायचे कसे, जीवनात येणाऱ्या प्रसंगांना सामोरे कसे जायचे, जीवनातील निर्णय घ्यायचे कसे आणि त्यातून सामाजिक अन् कौटुंबिक भान राखायचे कसे, हा सारा भाग विद्यार्थी अवस्था ते तारुण्य यामध्ये मनुष्य शिकत असतो. या काळात येणाऱ्या अनुभवातून तो पुढे पुढे मार्गक्रमण करत असतो. या सर्व प्रवासात त्याला आवश्यकता असते ती योग्य मार्गदर्शनाची, त्याच्या भावनांना समजून घेणाऱ्या सहकाऱ्यांची. मग तो सहकारी कोणी का असेना. आई-वडील असोत, मित्र-मैत्रिणी असोत, शिक्षक असोत वा अन्य कोणी असोत. कोणताही निर्णय घेण्याआधी आपल्या जवळच्यांना अथवा वरिष्ठांना त्याविषयी विचारणे, हा मनुष्यप्राण्याच्या प्राकृतिक स्वभावच आहे. मग तो निर्णय एखादी नवीन वस्तू विकत घेण्याची असो वा जीवनातील एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याचा असो. या वेळी जर योग्य ते मार्गदर्शन मिळाले नाही, तर मनुष्य दुसऱ्या टोकाचाही निर्णय घ्यायला मागे-पुढे पहात नाही.

मनाला मानसिक आधाराची, भावनांना समजून घेण्याची नितांत आवश्यकता असल्याने त्यांची निकड पालकच पुरवू शकणे

मुलांच्या आत्महत्यांमागील बहुतांशी कारण हे पालकांचा त्यांच्यावरील वाढता दबाव, कोवळया वयात त्यांच्यावर लादलेले अपेक्षांचे ओझे, असे म्हटले जात आहे आणि बऱ्याच प्रमाणात ते खरेही आहे. सध्याच्या धावत्या जगात आई-वडील दोघेही मुलाच्या उज्वल भवितव्यासाठी चाकरी करण्याचा, धनसंचय करण्याचा मार्ग स्वीकारतांना पहायला मिळतात. ज्या कोवळया वयात मुलांवर संस्कार घडवण्याची आवश्यकता असते, त्या वयातच दिवसातील बराच वेळ त्यांच्यापासून दूर राहून काढला जातो. मुलांना आपली उणीव भासू नये; म्हणून हवे-नको ते त्यांना दिले जाते. घरात मन रमावे; म्हणून संगणक, व्हिडिओ गेम्स आणून दिले जातात. महागडे भ्रमणभाष (मोबाईल) दिले जातात. मुलाचा सांभाळ करण्यासाठी एखादी बाई कामाला ठेवली जाते. आपल्या पाल्याने शिकून मोठे व्हावे; म्हणून लाखो रुपये डोनेशन्स भरून नावाजलेल्या शाळेत प्रवेश घेतला जातो, सुप्रसिद्ध कोचिंग क्लासेस, शिकवणी लावली जाते. सर्व प्रकारची शैक्षणिक सामग्री आणून दिली जाते, गाइड्स आणून दिले जातात. हे सर्व दिले की, आपले आपल्या पाल्याप्रती इतिकर्तव्य संपले, आता आपल्या पाल्याने चांगल्यापैकी अभ्यास करावा, चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावे, ही अपेक्षा ते करू लागतात. परंतु मुले म्हणजे काही यंत्र नव्हेत की, चांगला कच्चा माल टाकला की, उत्तम दर्जाचे उत्पादन सिद्ध करू शकतील. मनुष्यप्राणी आणि निर्जीव वस्तू यांमधील मुख्य भेद हाच आहे की, मनुष्याला मन असते आणि त्या मनात भावना असतात. या मनाला मानसिक आधाराची, भावनांना समजून घेण्याची नितांत आवश्यकता या वयात असते आणि ही त्यांची निकड त्यांचे पालकच चांगल्यापैकी पुरवू शकतात.

आईचे प्रेम आणि वडिलांचा धाक मुलांना शिस्त लावत असणे

पूर्वी पालक आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, यासाठी अहोरात्र मेहनत घेत असत. जन्माला येणारे मूल गर्भात असतांनाच त्याच्यावर चांगले संस्कार व्हावेत; म्हणून स्त्रिया रामायण, महाभारत यांसारख्या ग्रंथांचे वाचन करत असत. मुलाला समजायला लागले, चार शब्द बोलता येऊ लागले की, त्याला शुभंकरोती म्हणणे, रामरक्षा पाठांतर करणे, गीतेतील अध्याय म्हणणे, जेवतांना प्रार्थना करून जेवणे, दिवेलागणीच्या वेळेस आणि शाळेत जातांना देवासह घरातील मोठ्यांच्याही पाया पडणे, यांसारखे संस्कार घडवले जात असत. अभ्यास, खेळ, अल्पाहार, जेवण यांच्या वेळा काटेकोरपणे पाळल्या जात असत. जेवणातही मुलांना पौष्टिक असा आहार दिला जात असे. आई, आजी आणि आजोबा यांजकडून इतिहासातील शूरवीरांच्या, समाजसुधारकांच्या गोष्टी ऐकवल्या जात असत. आईचे प्रेम आणि वडिलांचा धाक मुलांना शिस्त लावत असे. बालपणीच योग्य ते संस्कार मिळाल्याने पुढे व्यवहारातही त्यांना ते उपयोगी पडत असत.

आधुनिक साधनाच मुलांच्या कोवळया मनावर संस्कार करत असणे

सध्या मात्र चित्र फार पालटले आहे. आई-वडील चाकरी करू लागल्याने मुलांवर संस्कार ते कसे घडणार ? त्यात केबल दूरचित्रवाणी, संगणकीय जाल (इंटरनेट), व्हीडिओ गेम घरोघरी आल्याने ही आधुनिक साधनेच मुलांच्या कोवळया मनावर संस्कार करू लागली आहेत. केबल दूरचित्रवाणीवर दाखवले जाणारे हिंसक आणि बीभत्स चित्रपट आजचे पालक आपल्या लहानग्यांसह बसून पाहू लागले आहेत. सेन्सॉर बोर्डाच्या मर्यादा शिथील झाल्याने पूर्वी चित्रपटगृहांतही जी दृश्ये पहायला मिळत नसत, ती आता प्रत्येक चित्रपटात घर बसल्या पहायला मिळू लागली आहेत. निराशा, अपयश आल्यावर मृत्यूला कवटाळायचे असते, याचे धडे मुलांना अशा चित्रपटांतून मिळू लागले आहेत. आत्महत्या करण्याच्या विविध पद्धतींविषयीचे ज्ञान त्यांना संगणकीय जालावर, दूरचित्रवाणीच्या माध्यमातून सहज मिळू लागले आहे. ज्यामुळे आतापर्यंत परदेशात घडणाऱ्या लहान मुलांच्या आत्महत्या आज महाराष्ट्रातही घडू लागल्या आहेत.

अपयशातून मनाला झालेला घाव भरून काढण्यासाठी व्यसनाला जवळ केले जाणे अथवा आत्महत्या करणे

दूरचित्रवाणी, संगणकीय जाल यांसारखी लोकहितासाठी बनवली गेलेली माध्यमे आज लोकांच्याच जिवावर उठली आहेत. संगणकीय जालामुळे जग जवळ आले, असे म्हणतात; पण जग जसे जवळ आले, तसे त्या जगातील चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टीच लोकांवर परिणाम करू लागल्या आहेत. वाईट सवयी पटकन लागतात, त्याप्रमाणे मानवाने वाईटालाच अधिक जवळ केले आहे. इंग्रज जाऊन आज ६२ वर्षे उलटल्यानंतर देशाचे भावी आधारस्तंभ पाश्चात्त्य संस्कृतीच्या आहारी जाऊ लागले आहेत. अनैतिक गोष्टींचे स्तोम माजू लागले आहे. नितीमत्ता लयाला जाऊ लागली आहे. जीवनात येणारे अपयश पचविण्याची क्षमता आजच्या तरुणांत राहिलेली नाही. अपयशातून मनाला झालेला घाव भरून काढण्यासाठी एकतर व्यसनाला जवळ केले जाते, नाहीतर मरणाला कवटाळले जात आहे. तरुणांचा कित्ता आता हळूहळू किशोरवयीन मुलेही गिरवू लागली आहेत. हे या देशाचे दुर्दैवच म्हणावे लागेल.

परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी आपला आत्मविश्वास ढळता कामा नये !

आज पुन्हा एकदा आवश्यकता आहे, मुलांना पुराणातील, इतिहासातील गोष्टी सांगण्याची, त्यांच्यातील सुप्त असा आत्मविश्वास जागृत करण्याची. चिमुकल्या वयात अखंड ईश्वरभक्ती करून ध्रुवाने अढळपद प्राप्त करून घेतले, मरणयातना भोगूनही प्रल्हादाने नारायणाचा गजर मुखातून विरू दिला नाही. त्यामुळे भगवंताला त्याच्या रक्षणासाठी नृसिंह अवतार घ्यावा लागला. वयाच्या सोळाव्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी अखंड विश्वाला मार्गदर्शक ठरणारी ज्ञानेश्वरी लिहिली. सतराव्या वर्षी छत्रपती शिवरायांनी शत्रूच्या दाढेतून तोरणा गड मिळवला. २२ व्या वर्षी झाशीची राणी गोऱ्यांवर तुटून प्राणपणाने लढली. या साऱ्या घटना आपल्याला काय सांगतात ? परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी आपला आत्मविश्वास ढळता कामा नये. प्रत्येकामध्ये देवाने सुप्त अशी शक्ती दिलेलीच आहे. आपल्याला तिला केवळ जागृत करायचे आहे. ती एकदा जागृत झाली की, कितीही मोठी संकटे येवोत, त्यांना सामोरे जाऊन ती परतवून लावण्याचे बळ आपल्यात येते. परीक्षेतील अपयश, कोणी दिलेली अपमानास्पद वागणूक ही काही मोठी संकटे नाहीत की, ज्यासाठी देवाने दिलेला सुंदर असा मानवजन्म क्षणांत संपवून टाकावा. जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटाला जो धीरोदत्तपणे सामोरा जातो, तोच जीवनात यशस्वी होतो. `अपयश ही यशाची पहिली पायरी आहे', असे म्हटले जाते. अपयशाला ढाल केले आणि आत्मविश्वासाची तलवार उपसली की, जीवनसंग्राम सहज जिंकता येतो, ही शिकवण आज मुलांना देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. यासाठी पालक आणि शिक्षक यांनी पुढाकार घ्यायला हवा !

- श्री। घाणेकर, मुंबई.
http://balsanskar.कॉम/

गुरुवार, १३ जानेवारी, २०११

सोमवार, ८ नोव्हेंबर, २०१०

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा भारत दौरा ....




अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा भारत दौरा ....
मी हाय कोली, सोडिल्या डोली, मुंबईच्या किनारी... या पारंपारिक कोळीनृत्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी लेडी मिशेल यांनाही विद्यार्थ्यांना नाचायला लावले . डान्स फ्लोअरवर कोळी ' ओबामा ' पारू ' मिशेल ओबामा हे दाम्पत्य कोळीनृत्यावर नाचत असल्याचे हे नयनरम्य चित्र रंगले ते कुलाब्याच्या होली नेम हायस्कूलमध्ये.

मुंबई दौ-यावर असलेल्या ओबामा यांनी आज सकाळी सपत्नीक होली नेम शाळेला भेट देऊन शाळकरी विद्यार्थ्यांसोबत दिवाळी साजरी केली.
हाय, हॅलो आणि नमस्ते म्हणत त्यांनी या विद्यार्थ्यांना हस्तांदोलन केले। तसेच प्रत्येकाला भेटल्यानंतर so nice to see u असेही आर्वजून सांगितले।

ओबामानी घेतला विद्यार्थ्यांचा क्लास
सेंट झेव्हियर्स कॉलेजच्या प्रांगणात आज सुमारे एक तास संवाद साधला तो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि मिशेल ओबामा यांनी। विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना बराक ओबामा यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली. पाकिस्तानशी असलेल्या संबंधांपासून ते अफगाण पॉलिसीपर्यंत आणि महात्मा गांधींच्या शिकवणीपासून ते अमेरिकेच्या प्रगतीपर्यंत विविध प्रश्न विद्यार्थ्यांनी त्यांना विचारले. जगातील सर्वात शक्तिमान राष्ट्रप्रमुख विद्यार्थ्यांमध्ये मनमोकळेपणाने मिसळत असल्याचे दृश्य निराळेच होते।

ओबामांची राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांनी मुंबई येथील मणीभवन या वास्तूस भेट देऊन गांधीजींना आदरांजली अर्पण केली.

यावेळी मणीभवन येथील `व्हिजिटर्स बुक` मध्ये उभयंतांनी संदेश लिहिला तसेच मणीभवनच्या व्यवस्थापकांसोबत संवादही साधला।

`स्लेव्हरी` हे पुस्तक माझ्यासाठी अमूल्य भेट - बराक ओबामा
उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना शनिवारी हॉटेल ताजमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी १८७३ मध्ये लिहिलेले स्लेव्हरी (गुलामगिरी) हे पुस्तक भेट दिले। त्यावेळी बराक ओबामा यांनी `ही आपल्यासाठी अमूल्य भेट असल्याचे` उद्गार काढले।

ओबामांनी जिंकले संसदेचे मन

भारताला भेट देणाऱ्या सहा अध्यक्षांपैकी संसदेत भाषण करणारे ओबामा हे अमेरिकेचे पाचवे अध्यक्ष ठरले आहेत। त्यांच्या 38 मिनिटांच्या भाषणात अनेकदा टाळ्यांचा कडकडाट झाला. ओबामा म्हणाले, ""महात्मा गांधीजींचं तत्त्वज्ञान अमेरिकेत पोचलं नसतं, तर मी तुमच्यासमोर उभा राहून भाषण करू शकलो नसतो,'' असं उद्‌गारले तेव्हा सेंट्रल हॉलमध्ये झालेला टाळ्यांचा कडकडाट अपूर्व होता.
"जय हिंद' असा भाषणाचा समारोप करून ओबामा परत निघाले, तेव्हा हस्तांदोलनासाठी धडपडणाऱ्यांसह प्रत्येक खासदाराच्या चेहऱ्यावर "अजि मी ओबामांना पाहिले' असे स्पष्ट भाव उमटले...स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, गुरूदेव रवीद्रनाथ टागोर, डॉ। बाबासाहेब आंबेडकर ते पंचतंत्र यातले सूचक दाखले देत जगातल्या एकमेव महासत्तेचे प्रमुख, अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर स्थायी सदस्यत्व मिळावे यासाठी पाठिंबा देण्याची ऐतिहासिक घोषणा आज केली. अफगाणिस्तानला पाक पुरस्कृत अल कायदाच्या स्वाधीन करून अमेरिका काढता पाय घेईल ही भारताला वाटणारी भीतीही त्यांनी अनाठायी ठरविली. अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानच्या जबाबदारीतून मुक्त व्हायला पुढच्या वर्षी सुरुवात करेल मात्र आम्हा सर्वांसाठीच धोका असलेल्या अतिरेक्यांच्या हाती आम्ही अफगाणिस्तानला पडू देणार नाही वा त्यांना वाऱ्यावरही सोडून देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. इराणने अण्वस्त्र विकासाचा कार्यक्रम सोडून द्यावा यासाठी भारताने आपले वजन वापरावे आणि म्यानमारमधील चीनच्या प्रभावाखाली असलेली हुकूमशाही आणि मानवी हक्कांची पायमल्ली रोखण्यासाठीही भारताने आवाज उठवावा, असे स्पष्टपणे सांगत आशियाई खंडातील भारताच्या भूमिकेबद्दलच्या अमेरिकेच्या अपेक्षाही त्यांनी उघड केल्या.

gs >kys R;kaP;k Hkkjr HksVhfo"k;h --- vkrk vki।k R;kaP;k fo"k;hp tk.kwu ?ks.kkj vkgksr ---

बराक हुसेन ओबामा (जन्म: ऑगस्ट ४, १९६१) हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. अमेरिकेचे ४४ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी जानेवारी २०, २००९ रोजी पदग्रहण केले. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार असलेल्या ओबामांनी नोव्हेंबर ४, २००८ रोजी झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार सेनेटर जॉन मॅककेन ह्यांचा ३६५ विरुद्ध १६५ मतांनी पराभव केला. ओबामा हे अमेरिकेचे पहिले आफ्रिकन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आहेत. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी ते इलिनॉय ह्या राज्यामधून अमेरिकेचे सेनेटर होते. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदासाठी त्यांनी सेनेटर जोसेफ बायडेन ह्यांची निवड केली आहे. ओबामा हे अमेरिकेच्या शिकागो ह्या शहराचे निवासी आहेत.

९ ऑक्टोबर २००९ रोजी त्यांनी जागतिक शांततावाढीसाठी व अण्वस्त्र प्रसार रोखण्यासाठी केलेल्या योगदानासाठी ओबामांना २००९ सालचे नोबेल शांतता पारितोषिक देण्यात आले।
जन्म, लहानपण व शिक्षण

बराक ओबामांचा जन्म अमेरिकेच्या हवाई राज्यातील होनोलुलु ह्या शहरात झाला. त्यांचे वडील बराक ओबामा सिनियर हे केन्या ह्या देशाचे नागरीक होते आणि त्यांची आई ऍन डनहम ही अमेरिकेच्या कॅन्सस ह्या राज्यातली होती. ओबामांचे प्राथमिक शिक्षण इंडोनेशिया ह्या देशातील जकार्तामध्ये झाले. ते १० वर्षाचे असताना हवाईला परतले आणि त्यानंतर त्यांच्या आजी-आजोबांनी त्यांना वाढवले. हवाईतून माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून राजकारणशास्त्र ह्या विषयातून १९८३ मध्ये पदवी घेतली आणि हार्वर्ड विद्यापीठाच्या कायदा विभागातून १९९१ मध्ये उच्च पदवी घेतली. हार्वर्डमध्ये असताना ते हार्वर्ड लॉ रिव्ह्यू चे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष होते. त्यानंतर पुढची १२ वर्षे त्यांनी शिकागो विद्यापीठामध्ये संविधानशास्त्र शिकवले.

कौटुंबिक व खाजगी आयुष्य
बराक ओबामांची मिशेल रॉबिन्सन ह्यांच्याशी १९८९ मध्ये शिकागोत भेट झाली व त्यांनी १९९२ साली लग्न केले. ओबामा दांपत्याला मलिया (वय: १० वर्षे) आणि नताशा (वय: ७ वर्षे) ह्या दोन मुली आहेत. आजी मॅडेलाईन डनहम ह्यांना ओबामा कायम आपल्या कुटुंबाचा मोठा आधारस्तंभ असे संबोधतात. अध्यक्षीय निवडणुकीच्या फक्त २ दिवसांआधी मॅडेलाईन डनहमांचे हवाईमध्ये वयाच्या ८५व्या वर्षी निधन झाले.

बराक ओबामांनी आत्तापर्यंत २ पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे ड्रीम्स फ्रॉम माय फादर (Dreams from My Father) हे आत्मचरित्र १९९५ मध्ये तर द ऑडासिटी ऑफ होप (The Audacity of Hope) हे पुस्तक २००६ मध्ये प्रकाशित झाले आहे. आपल्या दुसर्‍या पुस्तकात त्यांनी आपले राजकीय विचार सविस्तर मांडले आहेत.

बास्केटबॉल हा ओबामांचा आवडता खेळ आहे. निवडणुकीच्या धामधूमीत विरंगुळ्यासाठी ते बर्‍याचवेळ बास्केटबॉलचा आधार घेत असत. अध्यक्षीय निवडणुकीला उभे राहण्यापूर्वी ओबामांनी आपण धुम्रपान सोडत असल्याचे जाहीर केले. २००८ साली एका मुलाखतीमध्ये त्यांनी तरुणपणी मद्यसेवन व अंमली पदार्थांचे सेवन केले असल्याची कबुली दिली.

बराक ओबामा हे धर्माने ख्रिश्चन आहेत. "आपले वडील त्यांच्या लहानपणी मुस्लिम होते पण तरुणपणापासुन ते नास्तिक बनले, तर आपली आई धार्मिक नव्हती", असे ओबामा आपल्या द ऑड्यासिटी ऑफ होप ह्या पुस्तकात लिहितात. ओबामांनी इंडोनेशियात शिकताना गुप्तपणे मुस्लिम धर्मांतर केले होते किंवा ते एका मदरश्यामध्ये शिकत होते अशा स्वरूपाच्या अफवा निवडणुकीच्या काळात उठवल्या गेल्या होत्या, पण त्या खोट्या आहेत असे निष्पन्न झाले.ओबामा शिकागोच्या ट्रिनीटी युनायटेड चर्च ऑफ क्राइस्ट (Trinity United Church of Christ) चे सभासद होते, पण त्या चर्चचे पाद्री जेरेमाइयाह राईट हे प्रार्थनांदरम्यान वारंवार वर्णद्वेषी व अमेरिकाविरोधी वक्तव्ये करीत असल्याची बातमी डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्राथमिक निवडणुकांदरम्यान बाहेर आल्यानंतर ओबामांनी पाद्री राईटशी (आणि पर्यायाने ट्रिनीटी चर्चशी) असलेले संबंध तोडून टाकले.

जागतिक लोकप्रियता
बराक ओबामांच्या श्रोत्यांना मंत्रमुग्ध करुन टाकणार्‍या भाषणशैलीमुळे त्यांची तुलना मार्टिन ल्युथर किंग, जुनियर बरोबर केली जाते. केन्यन वडील, अमेरिकन आई, हवाईमधील जन्म, इंडोनेशियातील शिक्षण आणि आयव्ही लीग विद्यापीठांमधून उच्चशिक्षण ह्या सर्व गोष्टींमुळे ओबामांच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळीच झालर मिळाली आहे ज्यामुळे ऐतिहासिक कृष्णवर्णीय अमेरिकन राजकारण्यांच्या तुलनेत त्यांचे वेगळेपण उठून दिसते. ओबामांच्या २० जानेवारी २००९ रोजी झालेल्या वॉशिंग्टनमधील राष्ट्राध्यक्षपदाच्या शपथविधी सोहळ्याला लाखो चाहत्यांनी थंडीची पर्वा न करता हजेरी लावली.

ओबामांची लोकप्रियता केवळ अमेरिका देशापुरतीच सीमित नाही. २००८ साली बीबीसीतर्फे घेण्यात आलेल्या एका कौलामध्ये २२ देशांच्या लोकांनी (भारतासह) ओबामांना पसंती दाखवली आणि १७ देशांच्या लोकांनी ओबामा निवडून आल्यानंतर अमेरिकेचे जगातील इतर देशांशी संबंध सुधारतील असे भाकित केले होते.निवडणुकीमध्ये ओबामा विजयी झाल्याचे जाहीर झाल्यानंतर जगभरात त्यांच्या चाहत्यांनी जल्लोष व्यक्त केला. ओबामांचा विजय केन्यामध्ये प्रचंड धुमधडाक्यात साजरा केला गेला. केन्याच्या राष्ट्राध्यक्षांनी ह्या आनंदाप्रीत्यर्थ एका दिवसाची राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली. जगात इतरत्र युरोप, आशिया आणि दक्षिण अमेरिकेतील अनेक देशांमध्ये लोकांनी ओबामांच्या विजयाचे उत्साहाने व आशेने स्वागत केले. मात्र चीनमध्ये याबाबतीत अनास्था जाणवली तर पाकिस्तानात अनेकजण याबाबतीत साशंक होते.

श्रोत -wikipedia













मंगळवार, १२ ऑक्टोबर, २०१०

सहवास पर्व सुरू - प्राचार्य शिवाजीराव भोसले (भाग १३)


नियती महापुरुषांना उदंड गुणवत्तेचे वरदान देते. त्याच वेळी त्यांचे आयुर्मान हिरावून घेते. विवेकानंदांच्या बाबतीत तेच घडले. उभ्या भारताची यात्रा करणारे, दोन वेळा अमेरिकेत जाऊन येणारे, युरोपचा काही भाग पाहणारे, ब्रिटिशांच्या राजधानीत आपल्या भाषाप्रभुत्वाने आणि ज्ञानविज्ञान संपन्नतेने अनेकांना प्रभावित करणारे, भगिनी निवेदितांसारख्या प्रज्ञासंपन्न सुकन्यांचा भक्तिभाव संपादन करणारे विवेकानंद केवळ चाळीस वषेर् भूतलावर राहिले. त्यातले काही दिवस कालपुरुषाने हिरावून घेतले.

विवेकानंदांना लहानपणापासून मधुमेहाचा विकार होता. त्या काळी हा विकार रोखण्याचे प्रभावी मार्ग जगाला माहीत नव्हते. विवेकानंद उत्तम खेळाडू होते. सुदृढ बांध्याचे होते. शास्त्रीय संगीताचे जाणकार होते. त्यांच्या भाषाज्ञानाचे कौतुक होत असे. संस्कृत, इंग्रजी, बंगाली, पशिर्यन, फ्रेंच अशा विविध भाषांतून ते विचारविनिमय आणि सहज संवाद करीत.

त्यांना मनातून परमेश्वराची ओढ वाटत असे. पण जगाच्या रचनेत अनेक त्रुटी ठेवणारा परमेश्वर असे का करतो याचे कोडे पडत होते. कधी कधी ते म्हणत : ''स्वर्गात सिंहासन देणारा; पण भूतलावर भाकरीची भ्रांत पाडणारा लहरी देव मला मान्य नाही.''

त्यांचे मन हे एक कुरुक्षेत्र झाले होते. अनेक परस्परविरोधी विचारांचे संगर तेथे चालत असे. त्यांनी विवाह टाळला. संसार हा विचार सोडला. नोकरी, व्यवसाय, दव्यलाभ यांचे गणित मांडले नाही. ते जीवनाचे पूर्ण वेळ अभ्यासक व उपासक म्हणून जगले. जीवनाची अर्थपूर्णता ज्यावर अवलंबून आहे अशा परमतत्त्वांचे चिंतन, संशोधन केले. त्यासाठी पातंजल योग अभ्यासला. गुरूचा शोध घेतला आणि शेवटी ते रामकृष्णांच्या चरणी थांबले.

रामकृष्णांना विदेही स्थितीत विवेकानंदांचे पूर्वजन्म आणि भविष्यकालीन कार्य यांचे आकलन घडले. ते त्यांनी आपल्या मनात ठेवले. विवेकानंदांना अधिकारी मार्गदर्शक हवा होता. रामकृष्णांना आपल्या साधनेची गाथा ज्याला समजावून द्यावी असा अधिकारी शिष्य हवा होता. नियतीने ही गाठभेट घडवून आणली.

रामकृष्णांचा साधनाकाल संपला आणि त्यांना सिद्धावस्था प्राप्त झाली. या अवस्थेत कोलकात्यातील अनेक विद्वान, अधिकारी, समाजपुरुष त्यांच्याकडे आकृष्ट झाले.

विवेकानंदांना ओळखणारे सुरेंदनाथ मित्र, रामचंद दत्त, व्रजेंदनाथ सील असे काही सांगाती होते. त्यांनी त्यांना सांगितले की, ''तू शेलीच्या कविता वाच. रामकृष्णांना भेट.'' प्राचार्य हेस्टी यांनी पण तेच सुचविले.

विवेकानंदांचे आजोबा पारमाथिर्क होते. आई भाविक होती. वडील मात्र रसिक, विद्वान पण अज्ञेयवादी होते. परमेश्वर हा त्यांच्या लेखी एक गौण आणि अर्थशून्य विषय होता. त्यांना पशिर्यन काव्य फार आवडे. त्यांच्या दिवाणखान्यात रसिकांची आणि पंडितांची सभा भरे. या सभेत बाल नरेन्दाला आनंदाने आणि अगदी बरोबरीने सामावून घेतले जात असे.

आई रामायण महाभारताचे वाचन करीत असे. तशी ती व्रतस्थ होती. विवेकानंदांच्या जन्मापूवीर् तिने काशीच्या विश्वेश्वराला नवस केला होता. त्याला एक लक्ष बिल्वदले वाहण्याची प्रतिज्ञा केली होती. विवेकानंदांचा जन्म झाला आणि आईने असे गृहीत धरले का आपला सुपुत्र हा शिवाचा अंशावतार आहे. मुलाचा व्रात्यपणा असह्य झाला म्हणजे रागाने म्हणत असे : शिवाला मी पुत्र मागितला आणि त्याने हा रुद धाडला.

अशा अपवादभूत आणि विलक्षण मुलाला वडिलांनी पूर्ण स्वातंत्र्य दिले. विवेकानंदांचे शिक्षण वारंवार खंडित झाले. प्रगती पुस्तकात गुणसंख्येची झगमग कधी दिसली नाही. ते बी. ए. ची परीक्षा द्वितीय श्ाेणीत उत्तीर्ण झाले. तथाकथित गुणवत्ता यादीची तमा त्यांनी बाळगली नाही. पूवीर् हे शैक्षणिक वेड विकोपाला गेले नव्हते.

विवेकानंदांना ऑफिसर, वकील, डॉक्टर, इंजिनिअर असे काहीच व्हावयाचे नव्हते. त्यांना कृतार्थ आणि अर्थपूर्ण जीवन तपस्यापूर्वक जगावयाचे होते. जीवनाची महत्ता आणि अर्थपूर्णता ज्यावर अवलंबून आहे अशा तत्त्वांचा शोध आणि बोध हाच त्यांचा ध्यास होता. या ध्यासाने त्यांना रानोमाळ फिरवले आणि रामकृष्णांच्या पुढे उभे केले. या दोन व्यक्तिमत्त्वांची युती हा एक विलक्षण योग होता. दोघांच्या दर्शनी रूपात आणि जीवनशैलीत फरक होता.

रामकृष्णांची शाळा सुरुवातीलाच सुटली होती. ते बोलताना अडखळत. त्यांची अंगकाठी बेताची होती. ते समाजात फारसे फिरले, वावरले नव्हते. दक्षिणेश्वर आणि कोलकाता आणि त्यांचे जन्मगाव कामारपुकूर या परिघात ते राहिले, वावरले. एखादी तीर्थयात्रा एवढाच काय तो अपवाद! या उलट विवेकानंद हे राजबिंडे, रुबाबदार, व्यासंगी, वक्तृत्वसंपन्न, क्षात्रतेजाने तळपणारे, दिग्विजयी आणि विश्वसंचारी होते.

विवेकानंद हे कोणाची तमा बाळगणारे, कोणापुढे नमणारे किंवा कशानेही दीपून अथवा भारावून जाणारे नव्हते. रामकृष्णांकडे कोलकात्त्यातील मान्यवर आणि महाज्ञानी जात असत. यामुळे विवेकानंदांना त्यांचे कौतुक वाटे, त्यांच्याविषयी कुतूहल वाटे. अनेक वर्षांच्या सावध सहवासातून, अगदी तावून सुलाखून घेतल्यावर त्यांनी हे जाणले की ''पूवीर् जो राम झाला, कृष्ण झाला तोच हा रामकृष्ण.''

रामकृष्ण-विवेकानंद यांचे सहवासपर्व, संवादपर्व हे एक परमार्थ रामायण ठरले.

या रामायणात संस्कृतीचे सार आहे. सर्व धर्मांचा आशय आहे. ज्ञानविज्ञानाचा प्रकाश आहे. भगवान बुद्धांची करुणा आहे. शंकराचार्यांचा विवेक आहे. सॉक्रेटिसाचा संवाद आहे. जे-जे अर्थपूर्ण ते सर्व आहे. प्रगल्भ मनुष्यत्व आणि पारमाथिर्क दिव्यत्व यांचा प्रकाश आहे. चंदाच्या दिशेने झेप घेणाऱ्या शास्त्रज्ञाच्या मनातील विकल्प दूर करण्याची शक्ती आहे. निरासक्त संन्यस्तांची मानसिक श्रीमंती दुरिताचे तिमिर घालवू शकेल असा गाढ विश्वास आहे.

( क्रमश:)

- प्राचार्य शिवाजीराव भोसले

शुक्रवार, १६ जुलै, २०१०

mGinger ला जॉईन व्‍हा आणि एस.एम.एस. वाचून पैसे कमवा

SMS जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून कंपन्यांना होणारा फायदा जर तुम्हाला देखिल मिळणार असेल तर ... आणि पैसे कुणाला नको आहेत? तुम्हाला रोज SMS येतील ते फक्त वाचायचे आहेत आहे ना सोपं काम आणि हो ते तुम्हाला फुकट वाचायचे नाहीत तर प्रत्‍्येक SMS वाचल्‍यानंतर तुम्हाला 20 पैसे मिळणार आहेत। तुमच्या मित्रांना, नातेवाईकांनाही समाविष्ठ करून घ्या त्यांनी SMS वाचल्यावर देखील तुम्हाला प्रत्येक SMS वर 10 पैशाची कमाई होणार आहे. पैसे तुम्हाला तुम्ही दिलेल्या पत्यावर घरपोच चेकने मिळणार आहेत. तर मग वेळ न दवडता इथे क्‍लीक करा आणि तुम्‍हीही पैसे मिळवायला सुरूवात करा....
http://img.mginger.com/img/banner/mg468x60_red.png"/>

बुधवार, १४ एप्रिल, २०१०

adMAD ला जॉईन व्हा आणि SMS वाचून पैसे कमवा.


SMS जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून कंपन्यांना होणारा फायदा जर तुम्हाला देखिल मिळणार असेल तर हरकत नाही ना ... आणि पैसे कुणाला नको आहेत?
तुम्हा6ला रोज SMS येतील ते फक्त तुम्हाआला वाचायचे आहेत आहे ना सोपं काम आणि हो ते तुम्हा ला फुकट वाचायचे नाहीत तर प्रत्येतक SMS वाचल्याजनंतर तुम्हाला 20 पैसे मिळणार आहेत. तुमच्या मित्रांना, नातेवाईकांनाही समाविष्ठ करून घ्या त्यां नी SMS वाचल्यावर देखील तुम्हायला प्रत्येक SMS वर 10 पैशाची कमाई होणार आहे.
खाली तक्त्यात दाखविल्याळप्रमाणे तुम्ही् सर्कल तयार केले तर तुम्ही किती कमावू शकता तर चक्क 5160 रूपये.
पैसे तुम्हाला तुम्ही दिलेल्या पत्यावर घरपोच चेकने मिळणार आहेत. तर मग वेळ न दवडता

येथे टिचकी मारा

आणि तुम्‍हीही पैसे मिळवायला सुरूवात करा....

How Much You Get

Earn for 5 levels:

• Get 20 paise for each SMS you recieve.
• Get 15 paise for each SMS your friends recieve.
• Get 10 paise for each SMS their friends recieve.
• Get 5 paise for each SMS their friends recieve.
• Get 1 paisa for each SMS their friends recieve.

Calculator
Have fun calculating your earnings!
________________________________________
Ads you receive daily: 10


Friends you refer: 10

Friends each of them refers: 10

Friends each of them refers: 5

Friends each of them refers: 3

Every month, you can earn: 2

Rs. 5160.00